नारायणगाव -जिल्हाबंदी व संचारबंदी लागू असताना मुंबईतून भाजीपाल्याच्या गाडीत आणलेल्या एका व्यक्तीसह गाडी चालकावर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जयसिंग बबन शिंदे (वय 41, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. रायकरवाडी पिंपळवंडी, ता. जुन्नर) व वाहनचालक अक्षय रायकर (वय 28, रा. रायकरवाडी पिंपळवंडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोंडीभाऊ डामसे यांनी दिली आहे.
संचारबंदी केली असताना देखील जयसिंग शिंदे हे (दि.21) पहटे 5 वाजता त्यांच्या ओळखीचे भाजीपाला वाहनचालक अक्षय रायकर यांच्या वाहनातून भायखळा येथून खंडाळामार्गे पिंपळवंडी येथे आले.
त्यांनी येण्यापूर्वी पिंपळवंडी गावातील प्रशासनाची कोणतीही परवानगी अगर पास न घेता आले. त्यानंतर गावात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनास दिली नाही. आळेफाटा पोलिसांनी सर्व खातरजमा करून दोघांवर गुन्हा दाखल केला.