COVID-19 – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या करोनाच्या 1185 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 237 नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे करोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे केरळ (Kerala) राज्यातील आहेत.
केरळमध्ये गेल्या आठवड्यात केरळमध्ये करोनाचे 900 प्रकरणं नोंदवली गेली. देशातील एकूण करोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. दिलासादायक म्हणजे या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. दररोज या संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवासत सक्रिय रुग्णांची संख्या 500 इतकी होती. पण डिसेंबर महिन्यात थंडी (Winter) सुरु होताच करोनाचा आलेक वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.