मुंबई :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर या वेगवान गोलंदाजाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शमीने या स्पर्धेत सात सामन्यांत सर्वाधिक 24 बळी घेतले.
मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला शमीचे नाव समाविष्ट करण्याची विशेष विनंती केली आणि त्यानंतर त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला. कारण मूळतः त्याचे नाव देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या क्रीडा सन्मानाच्या यादीत नव्हते. 33 वर्षीय शमीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, जेथे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारत दुसऱ्या स्थानावर होता. शमी पहिल्या चार सामन्यांत खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने कहर केला. त्याने 5.26 च्या सरासरीने 24 विकेट्स घेतल्या.
शमीशिवाय अन्य 16 खेळाडूंच्या नावांची शिफारस
शमीशिवाय अन्य 16 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये पुरुष हॉकीपटू कृष्ण बहादूर पाठक आणि सुशीला चानू, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे आणि अदिती गोपीचंद स्वामी, बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन, बुद्धिबळपटू आर वैशाली, गोल्फपटू दीक्षा डागर, नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, कुस्तीपटू अनंत पंघल आणि कुस्तीपटू अनंत पंघळे यांचा समावेश आहे.
गेल्या दशकापासून मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जेव्हा संघाबाहेर असायचा तेव्हा गोलंदाजीचा प्रमुख भार शमीच सांभाळायचा. आता केंद्र सरकारची समिती यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.