Covid-19 : जगभरात हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना महामारी ही अजूनही चिंतेचा विषय आहे. हिवाळा सुरू होताच भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचीपुन्हा एकदा एंट्री झाली आहे. कारण कोरोनाचे नवीन 88 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांनी पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनवला आहे.
एका वृत्तसंस्थेच्याअहवालानुसार, नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या ३९६ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची एकूण संख्या 5 लाख 33 हजार 300 आहे. तर कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या ४ कोटी ५० लाख २ हजार १०३ आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे होणाऱ्या लोकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. एकूण 4 कोटी 44 लाख 68 हजार 407 लोक बरे होऊन घरी परतले आहेत.
मात्र, कोरोनाची लागण झालेले रुग्णही वेगाने बरे होत आहेत, ही दिलासादायक बाब आहे. अहवालानुसार, देशातील संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के आहे, जे समाधानकारक आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. वेबसाइटनुसार, भारतात आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे एकूण 220.67 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.