लक्षणीय वाढ सलग तिसऱ्या दिवशी कायम ….
नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 10 हजार जण नवे बाधित आढळले. एकून करोनाबाधितांची संख्या दोन लाख 26 हजार 770वर गेली आहे. तर देशात करोनामुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी सहा हजार 348 वर पोहोचली आहे.
देशांत सध्या एक लाख 10 हजार 960 सक्रिय बाधित असून एक लाख नऊ हजार 462 जण बरे होऊन घरी गेले आहेत. देशांत सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 77 हजार 793वर पोहोचली आहे. तर मरण पावलेल्यांची संख्या दोन हजार 710 आहे. तामिळनाडूत 27 हजार 256 जणांना लागण झाली असून 220 जणांचे मृत्यू झाले आहेत.
राजधानी दिल्लीत करोनाबाधितांच्या संख्येने 25 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर तेथे 650 जण मरण पावले आहेत. गुजरातमध्ये बाधितांची संख्या 18 हजार 584 असून बळींची संख्या एक हजार 155 आहे. राजस्थानात 9862 बाधत असून मृतांची संक्या 213 आहे. उत्तर प्रद्रशात नऊ हजार 237 केसेस आढळ्या असून मृत 245 आहेत. मध्य प्रद्रशात आठ हजार 762 बाधित असून 377 मरण पावले अहोत.
पश्चिम बंगालमध्ये हीच संख्या अनुक्रमे सहा हजार 876 आणि 355 अशी असून बिहारमध्ये साडेचार हजार बाधित संख्या झाली आहे. तेवढेच बाधित कर्नाटकात आहेत. तेथे मरण पावलेल्यांची संक्या अनुक्रमे 29 आणि 57 अशी आहे.