नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची स्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येत किंचिंत घट झाली आहे. मागच्या 24 तासांत 8084 नव्या बाधितांची नोंद झाली असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातील मुंबईत करोनाचा संसर्ग जास्त आहे. राज्यात 2946 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 1803 करोना रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/lGb3RW7Gdh pic.twitter.com/m9sOgQaoWS
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 13, 2022
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एकूण 1432 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 46 हजार 337 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.92 टक्के झाले आहे. राज्यात आज शून्य करोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे.
दिल्लीत रविवारी दिवसभरात 735 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस दिल्लीत करोनाचा संसर्ग दर तीन टक्क्यांच्या वर पोहोचला. त्यानंतर शनिवार आणि रविवारी पुढील दोन दिवस संसर्गाचा दर चार टक्क्यांच्या वर पोहोचला. पण रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.
तामिळनाडूत 249 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये 1332 रुग्ण करोनावर उपचार घेत आहे. चेन्नईमध्ये 124 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत.