नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोना बाधितांची संख्या लवकरच 6 हजारांचा टप्पा ओलांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील 24 तासांत कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 591 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सध्याच्या आकडेवारीनुसार, देशात 5218 रूग्ण आहेत, तर आतापर्यंत 477 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील 24 तासांत देशांत झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात आठ, गुजरात आणि मध्यप्रदेश प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मिरमध्ये दोन तसेच पंजब, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 9, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्ये प्रत्येकी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश, जम्मू कश्मीर आणि उत्तरप्रदेशमधून प्रत्येकी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर बिहार, हिमाचल प्रदेश आणि ओडिसामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांमध्ये 71 विदेशी नागरिक आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या 149 सांगितली होती.