नवी दिल्ली : पंचायत राज दिनानिमित्त त्यांनी देशातील सरपंचांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी करोनामुळे आपल्या समोर अनेक समस्या आल्या. अनेक समस्या अशा होत्या ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या समस्यांनी आपल्याला खुप काही शिकवले. यामुळे आपल्याला स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश मिळाला असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. संकटकाळातच जीवनाची खरी करोटी असते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ई ग्राम स्वराज’ या वेबपोर्टलचे तसेच स्वामित्व योजनेची सुरूवात करण्यात आली. “करोनाने आपल्याला स्वावलंबी बनण्यास शिकवले. स्वावलंबी बनल्याशिवाय कोणत्याही संकटाचा सामना करणे अशक्य आहे. गाव, जिल्हे, राज्य, देश हे या निमित्ताने आपापल्या स्तरावर स्वावलंबी बनले. यापुढे आपल्याला कोणत्याही गोष्टींसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये इतकं स्वावलंबी राहावे लागेल. सशक्त पंचायत हे स्वावलंबनाचे उदाहरण आहे,” असेही मोदी यावेळी म्हणाले.