वॉशिंग्टन – गेल्या वर्षभराच्या काळात सर्वच जगाला करोना महामारीचा फटका बसला असला तरी सर्वात जास्त परिणाम मध्यमवर्गाला बसला आहे. 1990 च्या दशकानंतर प्रथमच जगभरात मध्यमवर्गीयांची संख्या घटली आहे.
विकसनशील देशातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी अशी कबुली दिली आहे की या महामारीमुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे प्यू रिसर्च सेंटरच्या माध्यमातून याबाबतचे संशोधन करण्यात आले. गेल्या वर्षी ज्या लोकांचे दैनिक उत्पन्न 10 ते 50 डॉलर्स म्हणजेच 730 ते 3650 रुपये होते अशा लोकांची संख्या तब्बल 9 कोटीने घटली आहे अशा मध्यमवर्गीयांची संख्या आता 250 कोटीवर स्थिरावली आहे. दुसरीकडे ज्या लोकांचे दैनिक उत्पन्न 2 डॉलर्स म्हणजेच सुमारे 140 रुपये होते अशा लोकांची संख्या तब्बल 13 कोटींनी वाढली आहे तर ज्या लोकांचे दैनिक उत्पन्न 50 डॉलर्स किंवा 3650 रुपयांपेक्षा अधिक आहे अशा लोकांचा मध्यमवर्गात प्रवेश झाला असून ती संख्या 6 कोटी 20 लाख आहे. म्हणजेच करोना महामारीचा फटका एकूण 15 कोटीपेक्षा जास्त मध्यमवर्गीयांना बसला आहे. हा आकडा फ्रान्स किंवा जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. इतिहासात अशी उदाहरणे खूपच कमी आढळतात, अशी माहिती या संशोधनाचे प्रमुख राकेश कोचर यांनी दिली आहे