प्रयागराज – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातही उत्तर प्रदेशातील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. येथे करोनामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे प्रयागराज जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी अनेक मृतदेह पुरण्यात आले होते. मात्र पाऊस आणि वादळामुळे ते मृतदेह उघडे पडत आहेत. हे मृतदेह पुन्हा पुरण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाने वाळू टाकून मृतदेह पुन्हा पुरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भटक्या कुत्र्यांनी या मृतदेहाचे लचके तोडू नये म्हणून महानगर पालिकेच्या कर्मचार्यांनी या मृतदेहांवर वाळू टाकून हे मृतदेह पुन्हा पुरले आहेत.
It is against the rules to bury bodies near Ganga river, and we have appealed to the people to not do that. The local administration is helping them cremate their loved ones as per their rituals: Dhawal Jaiswal, SP Gangapar, Prayagraj (24.05) pic.twitter.com/OLEyRRhVkv
— ANI UP (@ANINewsUP) May 25, 2021
करोना संकटात गंगा नदीच्या किनाऱ्यावर मृतदेह पुरल्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर अनेक ठिकाणी मृतदेह नदीत सोडण्यात आले होते. या संदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र सरकारने हे आरोप फेटाळले होते. आता पाऊस आणि वादळामुळे नदीत पुरलेले मृतदेह उघडे पडत आहेत.
दरम्यान भटके कुत्रे उघडे पडलेल्या मृतदेहांचे लचके तोडत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उघडे पडलेले मृतदेह पुन्हा वाळूने झाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामाचे देखील फोटो आता व्हायरल झाले आहे.