ऐन उन्हाळ्यात पाळीवप्रण्यासह वन्यप्राण्यांसाठी ठरला नवसंजीवनी
गराडे (वार्ताहर)- कानिफनाध गडाच्या खोर्यात असलेल्या डोंगर खोर्यातील कडजाई पाझर तलाव हा गळाने भरलेला होता. त्या तलावतील पूर्ण गाळ व खोलीकरण करून तलाव मजबूत केला. त्याचबरोबर त्या तलावात दोन ठिकाणी 30 बाय 30 चे खोदकाम करून त्यात पाणी लागले असल्याने ओसाड माळरान व डोंगरी भागात कोठेही पाणी नसल्याने सर्वच प्राण्यांना आधार झाला असून त्यांना नवसंजीवनीच लाभली आहे.
पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका असून यावर्षी पाऊस कमी झाल्याने माणसांनाच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तर सध्या एप्रिल महिन्यातच ही अवस्था आहे तर जूनपर्यंत काय होईल हे सांगता येणार नाही. खरे तर त्याभागात पाण्याचेतर सोडाच खायलादेखील मिळणे अवघड असुले तरीपण शेतकरी आपल्या गुरव ढोरांना मोकळे फिरण्यासाठी सोडतात.
या भागात पाण्याची भयाण परिस्थिती असताना देखील तलावाची खोली वाढवणे व गाळ काढण्यासाठी उपसरपंच संजय कामठे यांनी आपला स्वत:चा जे. सी. बी. लावून आधी स्वतं:साठी आपल्या शेतीत गाळ कढून टाकला. परंतु गाळ भरपूर असल्याने त्यांनी आजूबाजूच्या शेतकर्यांना आवाहन केली की, ज्यांना गाळ लागेल त्यांनी फक्त घेऊन जाण्याची सोय करीन घेऊन जावा. मी माझा जेसीबी व डीझेल आणि चालकाचा पगार देईन, लागेल त्यांनी गाळ घेऊन जावा.
संजय कामठे यांनी त्या गळाची रॉयल्टी देखील भरली असल्याने व एक सामाजिक काम करण्याची इच्छा असल्यानेच हे करत असल्याचे सांगितले. हे खोद काम जमिनीपासून 17 फूट खोल व एकूण सहा एकरात केल्याचेही त्यांनी सांगितले. तर त्यातही त्यांनी दोन ठिकाणी प्राण्यांसाठो खड्डे घेऊन त्यात पाणी लागले आहे.