Congress PM Candidates : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची निर्मिती केली आहे. स्थापन झाल्यापासून इंडिया आघाडीचा विजय झाल्यास पंतप्रधान कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. अखिलेश यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी या नेत्यांचाही या शर्यतीत समावेश आहे. मात्र, काँग्रेस (Congress) कार्यकारिणीचे सदस्य आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असू शकतो, हे स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षाचे(Congress) नेते शशी थरूर (Shashi Tharoor)म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने विजय मिळवला तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करू शकते. थरूर म्हणाले की, विरोधी आघाडीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल दिसू शकतात. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव करून केंद्रात भारत आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते (Congress)शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी याविषयी बोलताना,’ निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र येऊन यावर निर्णय घ्यावा लागेल. त्यासोबतच कोणा एक नेत्याची निवड करावी लागेल. ते म्हणाले की, पण माझा अंदाज असा आहे की काँग्रेस पक्षातील खर्गे हे भारताचे पहिले दलित पंतप्रधान बनतील किंवा राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. आपल्यावर जी काही जबाबदारी असेल, ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू, असेही थरूर (Shashi Tharoor)म्हणाले.
दरम्यान, शशी थरूर (Shashi Tharoor)केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील टेक्नोपार्क येथे अमेरिकेतील D2C (डायरेक्ट-टू-कंझ्युमर) मार्केटप्लेस ‘वेडोटकॉम’ आणि सिलिकॉन व्हॅलीच्या व्यावसायिकांशी बोलत होते. यावेळी शशी थरूर यांच्या पंतप्रधानपदाविषयी केलेल्या सूचक वक्तव्यावर आता विरोधी इंडिया आघाडीतील नेत्यांकडून काही प्रतिक्रिया येते का ? हे पाहणे गरजेचे आहे.