मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा वारंवार राजकीय वर्तुळात सुरु असतात. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या एका आमदाराने पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे असं विधान केलं होत. कोणत्या घोड्यावर बसल्यावर फायदा होतो हे ज्याने त्याने ठरवायचं असत असं मत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत विधान केलं. “मराठवाड्यातील त्या एक कतृत्वान नेत्या आहेत,भाजपच्या महिला नेत्या आहेत. त्यांच कामही चांगलं आहे. त्यांना मी सभागृहात अनेक वर्ष पाहतोय. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत” असं स्पष्ट मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसेच त्यांना काय निर्णय घ्यायचाय हा त्यांचा प्रश्न आहे,कुठल्या पक्षात जावं,कुठल्या पक्षात यावं किंवा त्याच पक्षात रहावं यावर मी भाष्य करण उचित नाही.त्या एक कतृत्वाने नेत्या आहेत,समजदार आहेत सध्याची राजकीय परिस्थिती त्या जाणतात त्यामुळे कुठल्या घोड्यावर बसल्यावर फायदा होऊ शकतो हे त्याने ठरवायचं असत असंही चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमात दिसून येत नाहीत. त्यामुळे वारंवार पंकजा मुंडे यांना डावलला जात असल्याची खदखद त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होताना दिसते. या सर्व संघर्षाला आपली तयारी असून रडणार नाही तर लढणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज कार्यकर्त्यांना गेल्या वेळेस सांगितलं होत.