नवी दिल्ली : जमिनीशी संबंधित घोटाळ्यात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने काल कारवाई केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर काँग्रेसदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
याविषयी बोलताना खरगे यांनी,”नरेंद्र मोदी सरकार हे विरोधी पक्षांच्या विरोधात तपास यंत्रणांचा दुरुपयोग करतं आहे. लोकशाहीच्या हत्येचा हा कुत्सित प्रयत्न आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित सुमारे १५ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तुमचे
खास दोस्त असलेल्यांची संपत्ती जेव्हा गगनाला गवसणी घालते तेव्हा त्यांची चौकशी तपास यंत्रणा का करत नाहीत? असाही टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे.
पिछले 14 घंटे से मोदी जी ने बिहार के उपमुख्यमंत्री @yadavtejashwi के घर पर ED बैठा रखी है।
उनकी गर्भवती पत्नी और बहनें को सताया जा रहा है। @laluprasadrjd जी बुजुर्ग हैं, बीमार हैं, तब भी मोदी सरकार ने उनके प्रति मानवता नहीं दिखाई।
अब पानी सिर के ऊपर से चला गया है।
— Mallikarjun Kharge (@kharge) March 10, 2023
गौतम अदाणी प्रकरणावरून त्यांनी मोदींवर ही टीका केली आहे. एवढंच नाही तर देशातले अनेक व्यापारी बँका बुडवून पळाले तेव्हा मोदी सरकारच्या या तपासयंत्रणा काय करत होत्या? असाही प्रश्न खरगे यांनी विचारला आहे. मोदीजी मागच्या १४ तासांपासून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. त्यांची गरोदर पत्नी आणि त्यांची बहिण यांना विनाकारण त्रास दिला जातो आहे. लालू प्रसाद यादव यांचं वय झालं आहे ते आजारी आहेत तरीही मोदी सरकारच्या त्यांच्या प्रति माणुसकी दाखवायला तयार नाही या आशयाचे ट्विटही खरगे यांनी केलं आहे.
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. “माझ्या ७४ वर्षीय बाबांना नाहक त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाही सोडणार नाही. माझ्या बाबांना अशा प्रकारे त्रास देणं हे योग्य नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. वेळ खूप बलवान असते, यात खूप ताकद असते. हे कुणीही विसरू नये”, या आशयाचं ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.