चिंबळी -येथे इंद्रायणी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची “वाट’ लागली होती. याबाबत नागरिकांसह दैनिक “प्रभात’ने वेळोवेळी आवाज उठवल्याने अखेर प्रशासनाला जाग आली आणि रस्ता थेट कॉंक्रिटीकरण करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.
दरम्यान, याठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ आली होती, तर या खड्ड्यांमध्ये सांडपाणी तसेच पावसाचे पाणी साचत असल्याने अत्यंविधी व दशक्रिया विधीसाठी जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती.
नागरिकांनी “प्रभात’च्या साथीने या समस्या प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिल्याने अखेर प्रशासाने याची दखल घेत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कामाची पाहणी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व चिंबळी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा माजी सरपंच पांडुरंग बनकर यांनी केली.