डेहराडून – हरीद्वार येथे अलीकडेच झालेल्या धर्म संसदेतील द्वेषमुलक भाषणांच्या चौकशीसाठी उत्तराखंड सरकारने एक विशेष तपास पथकाची निर्मिती केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी उत्तराखंड सरकारवर चोहोबाजूने दबाव येत होता.
या प्रकरणात चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे, असे गढवालचे पोलीस उपमाहानिरीक्षक के. एस, नग्न्याल यांनी सांगितले. या प्रकरणात काही जणांना अटक होऊ शकते का? असे विचारता ते म्हणाले, या तपासात ठोस पुरावे हाती आले तर नक्की अटक करण्यात येईल.
गेल्या महिन्यात हिंदु धर्मात आलेला वसीम रिझवी ज्याचे धर्मांतरानंतर जितेंद्र नारायण त्यागी असे नामांतर करण्यात आले. त्याच्यासह साध्वी अन्नपूर्णा, धर्मदास, सिंधू सागर आणि यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या धर्मसंसदेत झालेल्या द्वेषमुलक भाषणांमुळे समाजातील विविध घटकांकडून तेथील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर प्रचंड दबाव आणला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या माजी पोलीश महासंचालकांनी ही धर्म संसद उत्तराखंडमधील शांततापूर्ण सहजीवनावर घाला घालणारे असल्याचे मत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आलीआहे.