पाचगणी – राज्याचा मुख्यमंत्री म्हणुन काम करत असताना दुर्गम व डोगरांळ सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देत पर्यटनामधून रोजगार सम्रुद्ध करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथील राजभवनातील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
ते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ महाबळेश्वर विकसित करत असताना जिल्ह्यातील इतर ठिकाणांची पर्यटनस्थळे सुद्धा बरोबरीने विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे . दळणवळणाच्या माध्यमातून आपटी तापोळा पुल व कास बामणोली दरे हा कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल दळणवळणाच प्रमुख मार्ग जोडण्याचा महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे . महाबळेश्वरला येणा-या पर्यटकांना वारंवार वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे . याकरीता नगरविकास खात्याकडून महाबळेश्वरला बस स्टॅड व रे गार्डन येथे सुसज्ज वाहनतळ उभारण्याकरीता निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली .
महाबळेश्वर तालुक्याला ३०० कोटीचा ईको टुरीझम मास्टर प्लँनला तातडीने मान्यता देत आहोत. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याकरीता पदनियुक्ती करण्यात येणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा अधिकारी नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याकरीता आर ओ या पदाची नियुक्ती लवकरात लवकर करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोयनेच्या बॅक वॅाटर लवादाच्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडल्यामुळे तापोळासह १०५ गावामध्ये सदैव पाण्याच दुर्भीक्ष होत.
त्यामुळे जलसपंदा विभागाकडुन बुडीत बंधारे बाधण्याच नियोजन केल जाणार आहे. तर सोळशी देवसारे येथे पाण्यात दुर्भीक्ष सोडवण्याकरीता सोळशी देवसारे डॅम केल जाणार असुन तांत्रिक अडचणी सोडवण्याकरीता निधी लवकरच उपलब्ध केला जाणार आहे . जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरणाकरीता जलसपंदाचे अतिरीक्त सचिव यांना सुचना देण्यात आल्या आहेत . पुस्तकाच गाव भिलार ब वर्ग पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्याबरोबर प्रतापगडसह सातारा जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ले संवर्धनाच काम हाती घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
महाबळेश्वर तालुका दुर्गम डोंगराळ असल्यामुळे मोठ्या एस टी बसेसला वाहतुकीला अडचणी येत आहेत . त्यामुळे छोट्या बसेस महाबळेश्वर तालुक्याला उपलब्ध करुन देण्याच्या सूचना परिवहन खात्याच्या सचिवाना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कास बामणोली येथील अनधिकृत बाधकामांना बजावलेल्या नोटीसा या पर्यटन वाढीकरीता उभारण्यात आलेल्याना पर्यावरणाचा ऱ्हास व पर्यावरणाला त्रास होणार नाही अशा देखील गोष्टीचा विचार लोकांनी घ्यायला हवा . गोरगरीब कष्टकरी जनतेच सरकार आहे . सर्वसामान्याना रोजगार निर्मीती पर्यटनाच्या माध्यमातुन होत असताना पर्यावरण देखील जपायल हव अस देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले . कादांटी खो-याचा विकास आराखडा हाती घेण्यात आला असुन कांदाटी खो-यातील १०५ गावातील रस्ते ,आरोग्य सुविधा , यासर्वगोष्टीनवर विचार सुरु आहे लवकरच विकास आरखडा तयार करुन लोकांना न्याय देण्याच काम आपण करु याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली .
यावेळी सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार , कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग , शिक्षणाधिकारी महाबळेश्वर पलसे , गट विकास अधिकारी महाबळेश्वर मरभळ. यांच्यासह सातारा जिल्ह्यातिल विविध प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते .