CM Eknath Shinde On Uddhav Thackeray – पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण 55 बैठकांमध्ये जवळपास 500 निर्णय राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले. त्यामुळे आम्हाला मोठे यश मिळले आहे. त्यामुळे आम्ही उणीधुणी काढण्यात लक्ष देत नाही,
आम्ही डेव्हेलपमेंटवर लक्ष देतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्ष जे सरकार होते त्यामध्ये केवळ स्पीडब्रेकर होता, असा टोलाही त्यांनी लगाविला.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, दीड दोन वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने केले काम आपल्या समोर आहे. मी त्याचा पाढा वाचू इच्छित नाही. राज्यातील सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. अनेक महत्त्वाकांशी प्रकल्पांचे उद्धाटन मेट्रोची उद्घाटन झाली. काही प्रकल्प गेमचेंजर्स होते, असे शिंदे म्हणाले.
आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्ष जे सरकार होते त्यामध्ये स्पीडब्रेकर, सर्व नकारात्म, प्रकल्प थांबवणे, प्रकल्पांमध्ये अडथळे आणणे या सगळ्या बाबी पाहायला मिळाल्या. पण आमचे सरकार स्थापन झाल्यावर मेट्रो आरे कारशेड आणि इतर प्रकल्प आम्ही गतीने सुरू केले.
आज इन्फ्रा म्हणून महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. एफडीआयमध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. जीडीपीमध्ये आपल्या राज्याचे सर्वाधिक कॉन्ट्रीब्यूशन आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सराकर हे डबल इंजिनचे सरकार काम करत आहे. अनेक प्रकल्प मार्ग लावले. नव्या प्रकल्पांना चालना दिल्या, असेही शिंदे म्हणाले.