पवनानगर – मावळ तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध तालुका असला तरी मात्र मावळ तालुक्यात बागायती शेतीही मोठ्या प्रमाणत केली जाते. त्यामध्ये कांदा, बटाटा, फरसबी, टोमॅटो, काकडी, मिरची, कारले, दोडका या पिकांसह ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, वाटाणा इतर पिके घेतली जातात. मात्र या वातावरणातील बदलाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ढगाळ वातावरनामुळे पिकांना आलेली ती फुले आता गळून पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पुणे जिल्हात गेल्या दोन दिवसपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे बागायती शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच कांद्याच्या पिकावरही मोठ्या प्रमाणात धुकं पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतीपिकावर करपा रोग येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात पाऊसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही भागात अवकाळीची रिमझिम
तर दुपारी ४ च्या सुमारास मावळ तालुक्यातील काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. सोमवार पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण असल्याने ऐन थंडीत शेतकऱ्यांना घाम फुटला आहे. तर त्यात थंडीचा महिना असतांना पावसाचा अंदाज वर्तविला जात असल्याने शेतकऱ्यांनी धास्ती बसली आहे.