लाहोर : पाकिस्तानातील दारा आदमखेल कोहाट येथील कोळसा खाणीच्या सीमा वादात दोन जमातींमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जवळपास १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या माध्यमांनी याविषयी माहिती दिली आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा खाणींच्या हद्दवाढीच्या वादातून सुनिखेल आणि अखोरवाल या दोन राष्ट्रांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. बुलंदरीच्या डोंगरी भागात राहत असलेल्या दोन जमातींममध्ये या सीमावादावरून वाद झाला. या वादात हिंसा भडकल्याने १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, दोनजण जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
बुलंदरी टेकडीच्या सीमा वादावरून सुनिखेल आणि अखोरवाल राष्ट्रांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. तसेच, या दोन जमातींमध्ये बैठकही आयोजित करण्यात आली होती. परंतु, तरीही या दोन जमाती एकमेकांसमोर भिडल्या आणि १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी धाव पोलिसांनी तत्काळ परिस्थित नियंत्रणात आणली. या दोन जमातींमध्ये दीर्घकाळ वाद सुरू आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून जखमींना पेशावरमधील रुग्णलायात दाखल करण्यात आळी आहे, अशीही माहिती माध्यमांनी दिली आहे.