पाटणा – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमच्यावर टीका केली तर त्याचे स्वागतच आहे, पण आमच्यावर टीका करताना त्यांनी शब्द मात्र काळजीपुर्वक वापरले पाहिजेत असे लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
बिहारच्या निवडणुकीत लोकजनशक्तीपक्ष आणि भाजप यांच्यात छुपी युती झाली असल्याचे सांगितले जात आहे. स्वत पासवान यांनीही आमचे भाजपशी नव्हे तर नितीशकुमारांशी भांडण असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आज भाजपलाच आपल्या बाबतीत काळजीपुर्वक शब्द वापरण्याचा जो इशारा दिला आहे त्याला महत्व आहे. नितीशकुमार यांनीच भाजपच्या सर्व ज्येष्ट नेत्यांची आपल्या विरोधात फिल्डींग लावली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
लोकजनशक्ती पार्टी आणि भाजप यांच्यात अजिबात सख्य नसल्याचे दर्शवण्यातच नितीशकुमार यांची सारी ताकद खर्ची पडत आहे असा दावाही त्यांनी केला.