मनपाचे दुर्लक्ष : मांजासाठी ग्राहकांचीच होत आहे मागणी
नगर – पंतंगबाजीला सुरुवात झाली की मांजाबद्दल तक्रारी येवू लागतात. हे नेमेची येतो पावसाळा याम्हणी प्रमाणे सुरू असते एकदा पतंग बाजीचे दिवस सरले की पुन्हा आठमहिने त्याविषयी कोणी काही बोलत नाही,असे वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र यंदा पतंगबाजीला सुरवात होताच चायना मांज्यामुळे दोन चार जणांना दुखापत झाल्याने हा मुद्दा सुरुवातीलाच ऐरणीवर आला आहे. मनपा यावर कडक कारवाई करणार का? हा खरा प्रश्न आहे.
वास्तविक पाहता या मांजामुळे दुखापती झाल्यानंतर या मांज्याच्या उत्पादनावरच शासनाने बंदी आणली आहे. मात्र लोकांमध्येच या मांजाची क्रेझ असल्याने यामांजाची मागणी होते. मग मागणी तसा पुरवठा या न्यायाने विक्रेते पुरवठा करतांना दिसतात. गायना मांजाच्या उत्पादनावर जरी बंदी घातली असली तरी त्याचे उत्पादन सुरू कसे, हा प्रश्न उपस्थित होतच त्याचं साधं उत्तर लगेचच मिळतं. मूळ उत्पादन जरी बंद असलं तरी चारभिंतीत या मांजाच उत्पादन करणाऱ्यांची संख्या कमी नाही. शिवाय ज्या ठिकाणच्या उत्पादनावर बंदी घातली त्याहून वेग़ळ्या ठिकाणी या मांज्याचं उत्पादन सुरू होते. त्यामुळे मांजाच्या उत्पादनावर बंदी घातल्याने फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
नगर शहरात अनेक दुकानांमधून चायना मांजाची सर्रास विक्री होताना पहायला मिळते. शिवाय मांज्याच्या विक्री करणाऱ्यांवर कोणतीही मोठी कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांमध्येही त्यावषयी फारशी भिती नाही. मनपाची टीम एखाद्या ठिकाणी धाड टाकते मांजा जप्त करते. फार तर नष्ट करते किंवा एखादी थातूर मातूर केस टाकते यापलीकडे त्यात फारसे काही घडत नसल्याने छोटे छोटे दुकानदारही या कारवाईला भिक घालत नाहीत. जोपर्यंत चायना मांज़्याचे उत्पादन बंद होणार नाही तोपर्यंत मांजा विक्री थांबणार नाही.
तरीही प्रशासन ढिम्म नालबंदखुट येथील सय्यद हारुन जरीवाला हे
माळीवाड्यातून दुचाकी वरुन जात असताना मांजा अचानक डोळ्याच्या समोर आल्याने डोळा वाचविण्याच्या झटापटी मध्ये मांजा डोळ्यांवरती लागून मोठ्या प्रमाणात डोळ्याला इजा झाली असून गाडीवरून पडल्यामुळे खांदाही सरकला आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचे सांगितले आहे. सध्या ते स्वस्तिक चौक येथील फाटके पाटिल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. गड किल्ले संवर्धक ठाकूरदास परदेशी रस्त्याने जात असताना माझ्या मुळे त्यांचाही गळा कापला गेला.चिनी मांजावर बंदी घालून विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. या मांज्यामुळे अनेकांचे डोळे कापले गेले आहे काहींना जीवही गमवावा लागला आहे. परंतु प्रशासनावर त्याचा परिणाम होताना दिसत नाही.