बिजींग : चीन आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची दूरध्वानीवर चर्चा झाली. त्यांनी सीमेवरील तणाव लवकरात लवकर कमी करण्यावर त्यांचे एकमत झाले.
गलवान खोऱ्यात घटनेचा योग्य पध्दतीने विचार करू. आणि सीमावर्ती भअगात शांतता कायम राखू, या मुद्द्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि भअरताचे एस. जयशंकर यांच्यात एकमत झाले.
याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिध्दीस दिले. प्रत्यक्षातील स्थिती लवकरात लवकर सामान्य करण्यासाठी दोन्ही बाजूने एकमत झाले. दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार सीमेवर शांतात नांदण्यासाठी प्रयत्न करण्याचे दोन देशांत ठरले.
वांग यांनी सांगितले की, भारताने परिस्थितीचा शोध घ्यावा. जबाबदार असणअऱ्यांवर कारवाई करावी. सर्व प्रकारची प्रक्षॅभक कृत्ये थअंबवावीत. पुन्हा अशी घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
चीनने दिलेल्या निवेदनात, भअरताला शांततेने ही समस्या सोडवायची इच्छा आहे. चर्चेने या भागातलि तणाव कमी करावा असे जयशंकर यांनी सांगितले असल्याचे म्हटले आहे.