नवी दिल्ली – मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सक्रीय भूमिका घ्यावी. न्यायालयाने दिलेया निर्णयानंतर हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले आहे, तेंव्हा राज्यातील गरीब मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने स्पष्ट आणि सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली मराटा आरक्षणाचा पेच आणि अन्य 12 मुद्द्यावर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे शिष्टमंडळातील नेत्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणामध्ये केंद्राची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि वादळात झालेल्या नुकसान भरपाईचे यासह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. या विषय पंतप्रधान सकारात्मक पध्दतीने सोडवतील, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीती निवासस्थानी सुमारे दीड तास या चार नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. आमच्या चर्चेत कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
12 मुद्दे सांगितले : पवार
12 मुद्दे आम्ही पंतप्रधानांना सांगितले. चर्चा सकारात्मक होती. हे मुद्दे तपासून निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. ओबीसींचे राजकीय आरक्षण काढल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यात अडचण आहे. सर्व राज्यासाठी एक धोरण अवलंबले पाहिजे असा आम्ही आग्रह धरला. याशिवाय मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा आणि जीएसटीचा प्रश्न प्रलंबित आहे, तो लवकरात लवकर सोडवावा. तसेच पीकविम्यासंदर्भात चर्चा झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.
पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट : उद्धव ठाकरे
पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नाते तुटले असा होत नाही. पंतप्रधानांना भेटण्यात गैर काय? मी काय नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं व्यक्तीगत भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे यांच्यात अर्धातास व्यक्तीगत भेट झाल्यानंतर राजधानीत राजकीय अंदाजांचे अनेक पतंग सुटले. मात्र, ही केवळ व्यक्तीगत भेट असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
या बारा मुद्द्यांवर चर्चा
– मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी
– इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण
– मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
– मेट्रोसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
– जीएसटीचा परतावा वेळेत मिळावा
– पीकविमा अटी-शर्तींचं सुलभीकरण
– राज्यात बल्क ड्रग पार्कच्या निविदेस मंजुरी
– नैसर्गिक आपत्तीबाबत मदतीचा निकष बदल
– चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
– चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
– राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड