जयपूर – राजस्थानचे (माजी) उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजस्थानसह देशभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर आता पायलट यांच्या रूपाने काँग्रेस आणखी एक तरुण नेता गमावण्याची चिन्हं आहेत.
राज्यात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री अशोक गेहलोत व तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यादरम्यान कुरबुर असल्याचं पाहायला मिळत होत. अखेर पायलट यांनी आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असून गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला.
दरम्यान आज मुख्यमंत्री गेहलोत यांनी पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधला असून, ‘केवळ चांगले इंग्रजी बोलणे, चांगले बाइट्स देणे आणि देखणे असणे यावर सारकही अवलंबून नसते. देशाबद्दल, तुमच्या विचाधारेबद्दल, धोरणांबद्दल आणि या सर्वांशी असलेल्या बांधिलकीबाबत तुमच्या हृदयात नेमकं काय आहे हे देखील महत्वाचं असतं.’ या शब्दांमध्ये त्यांनी सचिन पायलट यांचे कान उपटले आहेत.
Speaking good English, giving good bytes and being handsome isn’t everything. What is inside your heart for the country, your ideology, policies, and commitment, everything is considered: Ashok Gehlot, Rajasthan Chief Minister pic.twitter.com/xHS5WzajWb
— ANI (@ANI) July 15, 2020
यावेळी बोलताना त्यांनी, ‘मी गेली ४० वर्ष सक्रिय राजकारणात आहे. आम्हाला राजकारणातील नव्या पिढीबाबत प्रेम असून भविष्य त्यांचंच असणार आहे. नव्या पिढीला केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जर आम्ही आमच्या काळात जे केलं ते त्यांनी केलं असत तर कदाचित त्यांना आम्ही कोणत्या परिस्थितीतून गेलो आहोत याचा अंदाज आला असता.’ असं वक्तव्य करत पायलट यांना पक्षाने भरभरून दिल्याचा दावा पुन्हा एकदा केला.
I have been in politics for 40 years, we love the new generation, the future will be theirs. This new generation, they have become central ministers, state presidents if they had gone through what we did in our time, they would have understood: Ashok Gehlot, Rajasthan CM pic.twitter.com/2QpXs8rexM
— ANI (@ANI) July 15, 2020
तत्पूर्वी काल, गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपला सोबत घेत राजस्थानातील सरकार पडण्याचा कट रचला होता असा गंभीर आरोप लगावला होता. तसेच पायलट यांच्या बंडानंतर त्यांच्यावर पक्षाने कडक कारवाई करावी यासाठी देखील ते आग्रही होते.