कॉंग्रेस सरकारचा निर्णय
जयपुर- राजस्तानातील कॉंग्रेस सरकारने राज्यात वैदिक शिक्षणासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वैदिक संस्कृती, भारतीय परंपरा आणि मुल्ये याचे भविष्यातील पिढीला शिक्षण देण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.
येथील बिर्ला ऑडिटोरियम मध्ये भामशहा संमेलनात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील शिक्षण पद्धतीत नवीन प्रयोग करून त्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेहलोत म्हणाले की सरकारे येतील आणि जातील पण शिक्षण पद्धतीत कोणताही हस्तक्षेप होता कामा नये.
ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात शिक्षणासाठी सीएसआर फंडातून पैसे देण्याची सक्ती भारतीय उद्योप क्षेत्रला करण्यात आली होती. युपीए सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षणाचा फार मोठा विकास झाला होता अशी माहितीही त्यांनी दिली.