Chhattisgarh Elections 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अंबिकापूरच्या सुरगुजा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. या बैठकीत त्यांनी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देतानाच केंद्रातील सत्ताधारी भाजपवरही जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने 2018 मध्ये दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना म्हटले आहे की, “पेन काढून लिहून घ्या, शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील.” 2018 मध्ये आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसगडशी माझे जुने नाते आहे.
आम्ही धान्याचे 2500 रुपये प्रति क्विंटल दिले –
राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हाला दोन-तीन आश्वासने दिली होती. आमचे सरकार आल्यावर दोन-तीन कामे नक्कीच होतील, असे आम्ही म्हटले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सर्वात मोठे काम होते, ही काही छोटी गोष्ट नव्हती. त्यावेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्ष खरे बोलत नसल्याचे म्हटले होते. धानासाठी प्रतिक्विंटल 2500 रुपये दर मिळतील, असे आम्ही सांगितले होते. असे करता येणार नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले होते. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, मंगळवारी (दि. 7) छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यावेळी 74 टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येथे 20 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होणार आहे तर निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होतील.