रायपूर – सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपल्यावर राजकीय हेतूने “खोटे” आणि खोडसाळ आरोप केल्याचा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे. हे आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याचे एक षडयंत्र आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मेहतांच्या आरोपांना योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडच्या नागरी पुरवठा विभागाच्या एका घोटाळ्याशी संबंधित प्रकरण राज्याबाहेर हस्तांतरित करण्याची मागणी ईडीने सर्वोच्च न्यायालयाचा एका याचिकेद्वारे केली आहे. त्यावेळी ईडीतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे खोडसाळ आरोप केल्याचे बघेल यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानमधील दोन वर्षांच्या चिमुकलीवर भारतात यशस्वी शस्त्रक्रिया
या घोटाळ्यातील काही आरोपींना जामीन मंजूर करण्यासाठी संबंधित कोर्टाच्या न्यायाधीशांनी दोन दिवस आधी मुख्यमंत्री बघेल यांची भेट घेतली होती, अशी माहिती एका व्हॉट्सअप चॅटमधून उघड झाल्याचे तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत नमूद केले होते. छत्तीसगड सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की मुख्यमंत्री बघेल कधीही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भेटले नाहीत.
बघेल यांनी ट्विट केले की, सॉलिसिटर जनरल सारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती राजकीय हेतूने खोटे आणि खोडसाळ आरोप करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही कोणाला भेटलो नाही. न्यायाधीश आणि कोणत्याही आरोपीसाठी कोणतेही उपकार करण्याची विनंती केली नाही.
माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा हा कट आहे, ज्याचा योग्य तो बदला घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी हिंदीतील दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपल्यावर राजकीय हेतूने “खोटे” आणि खोडसाळ आरोप केल्याचा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे. हे आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याचे एक षडयंत्र आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मेहतांच्या आरोपांना योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडच्या नागरी पुरवठा विभागाच्या एका घोटाळ्याशी संबंधित प्रकरण राज्याबाहेर हस्तांतरित करण्याची मागणी ईडीने सर्वोच्च न्यायालयाचा एका याचिकेद्वारे केली आहे. त्यावेळी ईडीतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे खोडसाळ आरोप केल्याचे बघेल यांचे म्हणणे आहे. या घोटाळ्यातील काही आरोपींना जामीन मंजूर करण्यासाठी संबंधित कोर्टाच्या न्यायाधीशांनी दोन दिवस आधी मुख्यमंत्री बघेल यांची भेट घेतली होती, अशी माहिती एका व्हॉट्सअप चॅटमधून उघड झाल्याचे तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत नमूद केले होते.
छत्तीसगड सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की मुख्यमंत्री बघेल कधीही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भेटले नाहीत. बघेल यांनी ट्विट केले की, सॉलिसिटर जनरल सारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती राजकीय हेतूने खोटे आणि खोडसाळ आरोप करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही कोणाला भेटलो नाही. न्यायाधीश आणि कोणत्याही आरोपीसाठी कोणतेही उपकार करण्याची विनंती केली नाही. माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा हा कट आहे, ज्याचा योग्य तो बदला घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी हिंदीतील दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.