Chhagan Bhujbal – ओबीसींच्या लढ्यात आपण एकटे नाही तर राज्यातील आणि देशातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत. आमचे जे आरक्षण आहे ते आता बलदंड लोक घेऊन जाणार. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटल्यामुळेच बोलतो आहे अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. अगोदर आमच्यात ३७४ जाती होत्या, त्या आता हजार होतील.
दरम्यान, आता आरक्षण मुद्द्यावरून तुम्ही सरकारमध्ये राहुन लढणार का बाहेरून या प्रश्नावर मात्र भुजबळ काहीसे भडकल्याचे दिसले.ते म्हणाले की ‘मी राहायचे की जायचे हे माझ्या पक्षाने ठरवावे, मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला ओबीसींच्या प्रश्नाची चिंता असून कोणत्याही पदाची अभिलाषा नाही. तुम्हीच त्यांना जाऊन सांगा मला काढा म्हणून अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
नारायण राणे यांनीही दिली इशारा –
दरम्यान, आरक्षण हा नाजूक प्रश्न आहे. सरकारने त्याचा सखोल विचार करावा. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचे असते एवढेच मला सांगायचे आहे असे ट्वीट करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही इशारा दिला आहे. मराठा आरक्षण विषयावर त्यांनी अगोदर पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र ती अचानक रद्द करण्यात आली.
आता पत्रकार परिषद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आणि इतिहास सांगणाऱ्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी असेही त्यांनी नमूद केले. तसेच स्वाभीमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही तसेच असे केल्याने ओबीसींवर अतिक्रमण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.