Chhagan Bhujbal and family । राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी व्यवहाराप्रकरणी दाखल केलेला खटला विशेष न्यायालयाने बंद करून निकाली काढला आहे.
दोन महिन्यांपूर्वी हायकोर्टाने या प्रकरणातील तक्रार रद्द केल्याने या प्रकरणातील तपास बंद करण्यावर विशेष कोर्टाकडून शिक्कामोर्तब केला आहे. सत्यन केसरकर आणि निमिष बेंद्रे यांच्या नावावर मालमत्ता विकत घेतल्याचा भुजबळांवर आरोप होता.
ही मालमत्ता मुळात भुजबळ कुटुंबाची असल्याचा आरोप आयकर खात्याने केला होता. आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी खटला बंद केला. । Chhagan Bhujbal and family
मुंबईतील मालमत्ता व नाशिक कारखान्यांसह तीन कंपन्यांच्या कथित बेनामी संपत्तीची छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर यांच्याविरोधातील तक्रार मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. बेनामी व्यवहार प्रतिबंध सुधारित कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते.
बेनामी व्यवहाराप्रकरणी आयटी विभागाने भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., परवेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि आणि देविशा कनस्ट्रक्शन प्रा.लिवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या कंपन्यांद्वारे बेनामी व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आयटीने केला होता.
या तक्रारीच्या आधारे, दंडाधिकाऱ्यांनी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी भुजबळ कुटुंबीयांविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली होती. या निर्णयाविरोधात तसेच तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तिन्ही कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने याप्रकरणी निर्णय देताना भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धची तक्रार आणि दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली फौजदारी कारवाई रद्द केली. । Chhagan Bhujbal and family
संबधित बातम्या…
‘मला लाथाडायची भाषा करू लागले….’; छगन भुजबळांनी सांगितलं राजीनामा देण्यामागचं खरं कारण
“16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला..” ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी बॉम्बचं टाकला