Obc Elgar Sabha – गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडत आहेत. जरांगेच्या भूमिकेला मंत्री छगन भुजबळ हे कडाडून विरोध करत आहेत. आज छगन भुजबळ यांची नगरमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेमध्ये आपण पहिली सभा ज्यावेळी घेतली त्यापूर्वीच राजीनामा दिला होता असा बॉम्बच भुजबळांनी टाकला.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका मांडताहेत. त्यामुळे विरोधकांसह सत्तेतील काही आमदारांकडून देखील भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्या सर्वांना भुजबळांनी सडेतोड उत्तर दिल आहे. आपण यापूर्वी राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट भुजबळांनी या सभेतून केला आहे.
१७ नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली अंबडला झाली आणि १६ ओव्हेबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो.असा बॉम्बच भुजबळांनी यावेळी टाकला .मी अडीच महिने शांत राहिलो. कोण म्हणाल राजीनामा द्या.. कोण काय म्हणाल पण मी ओबीसीसाठी शेवटपर्यंत लढणार आहे असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले.
तुम्ही तर म्हणाले गुलाल उधळला.. अध्यादेश आला.. आरक्षण मिळालं मग परत उपोषण कशाला ? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी यावेळी जरांगे यांना उद्देशून उपस्थित केला. मराठा समाजाला आमचा विरोध नाही.परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्या. मुख्यमंत्री म्हणाले मी मराठा समाजाला दिलेली आरक्षणाची शपत पूर्ण केली मग हा ओबीसी आयोग कशासाठी ? असंही ते यावेळी म्हणाले.
भर सभेत छगन भुजबळ यांनी काही दाखले दाखवले यामध्ये खाडाखोड करून नोंद करण्यात आल्याचे दाखवले. मराठी कुणबी तसेच कुणबी मराठा अशा नोंदी हाताने लिहिलेल्या नोंदी यावेळी भुजबळांनी सर्वांसमोर मांडत ही दिशाभूल कशासाठी असा सवाल उपस्थित केला. यावेळी कर्पुरी ठाकूर यांना भारत रत्न दिल्याबद्दल भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.या मेळाव्यासाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते देखील उपस्थित होते.
Chhagan bhujbal, obc elgar sabha, maratha reservation,Manoj jarange