मुंबई –भारतीय संघ व्यवस्थापन चेतेश्वर पुजाराला नव्हे तर अजिंक्य रहाणेलाच लक्ष्य बनवत आहे, अशा शब्दात विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी निवड समितीवर तसेच संघव्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी काही खेळाडूंचे संघातील स्थान धोक्यात आल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले होते.
त्यावेळी सगळ्यांनाच पुजाराच्या संघातील समावेशाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, संघ व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष्य पुजारा नसून रहाणेच आहे, असेही गावसकर यांनी वर्तवले आहे.
कोहली कर्णधार असल्याने त्याच्या स्थानाला धोका नाही पण पुजारा व रहाणे यांच्या स्थानाला धोका आहे, असेही गावसकर म्हणाले.