मुंबई – राज्यसह अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. अशातच शिवसेनेचे औरंगाबादचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली आहे.
दरम्यान चंद्रकांत खैरे म्हणाले,’शिवसेनेची स्थापना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली असून आजच्या काळात शिवसेना उद्धवजींनी सांभाळलेली आहे. धनुष्यबाणावर अनेकजण निवडून आलेत. आज ते फुटलेत. घटनेपुढे यांना मान्यता मिळालेली नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यामुळे रामशास्त्री प्रभूणेंप्रमाणेच सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या धनुष्यबाणासहित इतर मागण्यांना मान्यता देईल, अशी आम्हाला आशा वाटते. सत्याचा विजय होऊ दे…अशी प्रार्थना देखील चंद्रकांत खैरेंनी केली आहे.’