नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च नायायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. ५ सदस्यीय घटनापीठाकडे आज अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. आमदारांची अपात्रता त्यासोबतच शिवसेना कोणाची ? निवडणूक आयोग निर्णय पद्धती या सर्व गोष्टीबाबत आज न्यायालय काय भाष्य करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आज सुनावणी सुरु झाली. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने कोर्टासमोर आपले म्हणणे मांडले.
ठाकरे गटाच्या वतीने तब्बल २ तास जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कब्बील सिब्बल यांच्यासह मनू सिंगवी यांनी बाजी मांडली. घटनापीठाने काही काळासाठी विश्रांती घेतली तात्पुरती सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात केली. यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणाचा दाखला दिला. १९७२ मधील काँग्रेस फुटीचं हे प्रकरण आहे. त्या निकालात कोर्टाने विधीमंडळ आणि राजकीय पक्ष दोन्हींचा विचार केला होता हे ठाकरे गटाने निदर्शनास आणून दिलं.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होत आहे.आत्तापर्यंत फक्त शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद झाला असून, अद्यापही शिंदे गट तसंच निवडणूक आयोगाच्या वतीने बाजू मांडणं बाकी आहे. त्यामुळे आजची सुनावणी लांबण्याची शक्यता असून आज निकाल येणार की नाही हे पहावं लागणार आहे.