रत्नागिरी – राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने अनिल परब यांच्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समिती साई रिसॉर्टवर दाखल झाली आहे.
पर्यावरण खात्याचे पाच जणांचे पथक मुरुडमधील रिसॉर्टवर दाखल झाले आहे. या पथकामध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत.
साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेल्या टीमकडून आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली याची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरणाच्या हानीचीदेखील या टीमकडून चौकशी सुरु आहे.
मानवी तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा कायम
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टने सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेली टीम ही रिसॉर्टप्रमाणेच कोच रिसॉर्टचीदेखील चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती; संजय राऊत म्हणाले…