नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात शनिवारी मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर या वादाने हिंसक वळण घेतले होते. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जहांगीरपूर येथे आरएएफचे दोन तुकडी तैनात केली आहे.
Spoke to Hon’ble LG. He assured that all steps are being taken to ensure peace and that guilty will not be spared. https://t.co/AMXEatbsub
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 16, 2022
या हिंसेच्या संदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निषेध व्यक्त केला, तर दुसरीकडे सुरक्षेच्या जबाबदारीवरून केंद्राकडे बोट दाखवले आहे. तर भाजपने केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे.
दिल्लीतील परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीचा मी निषेध करतो, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. ते पुढे म्हणाले,’मी सर्व जनतेला शांतता राखण्याचं आवाहन करतो.’
केजरीवाल पुढे म्हणाले की, ‘दिल्लीतील यंत्रणा, पोलीस यांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे.’