शेतकरी, व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र
3,169 टन मध्य रेल्वे अंतर्गत कृषी उत्पादन वाहतूक
पुणे – मध्य रेल्वेंतर्गत धावणाऱ्या किसान रेल्वेद्वारे तब्बल 3 लाख 169 टन कृषी उत्पादने आणि पार्सलची वाहतूक करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेकडून शेतमाल आणि नाशवंत पदार्थांची वाहतूक करण्यासाठी विशेष किसान रेल्वे सोडण्यात येते. देवळाली ते दानापूर मार्गावर किसान रेल्वे सुरू केली असून, ही सेवा मुजप्फरपूरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. या गाडी सांगोला आणि पुण्याहून लिंक रेल्वे जोडण्यात येत आहे.
मध्य रेल्वेंतर्गत सुरू केलेल्या किसान रेल्वेद्वारे 7 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत 12 फेऱ्यांतून तब्बल 3 लाख 169 हजार टन कृषी उत्पादने आणि पार्सलची वाहतूक केली आहे. यामध्ये डाळींब, सिमला मिरची, मिरची, आले, लिंबू, मासे आदी नाशवंत पदार्थांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेंतर्गत धावणाऱ्या किसान रेल्वेला शेतकरी, व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवड्यापासून ही गाडी आठवड्यातून तीन वेळा सोडण्यात येते. याशिवाय विविध स्थानकांवर पीओएस मशिनची सेवा सुरू केली असून, याद्वारे शेतकऱ्यांना माल वाहतूक करणे सोपे होत आहे, असे प्रशासनाने सांगितले.