वाल्हे – येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सरपंच अमोल खवले यांनी व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केल्याचा घटनाक्रम सांगितला.
यावेळी माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, त्रिंबक भुजबळ, दीपक कुमठेकर, सत्यवान सूर्यवंशी, हनुमंत पवार, गणेश कुमठेकर, जगन्नाथ काकडे, अंकुश भुजबळ, गणेश गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच दत्तात्रय पवार यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत पवार यांनी आभार मानले.