इंदूर :- इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने सध्या 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीप करेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये तीन बदल करण्यात आले आहेत.
India have opted to field in the final #INDvSA T20I!
Can they complete a clean sweep? 🤔 pic.twitter.com/tlNlY6iVup
— ICC (@ICC) October 4, 2022
विराट कोहली आणि केएल राहुलला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अर्शदीप सिंग जखमी झाला आहे. रोहितने सांगितले की, दुखापत गंभीर नाही आणि तो बरा होईल. या तिघांच्या जागी श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने संघात बदल केला आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजेला वगळल्यानंतर अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियसला संधी देण्यात आली आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, दीपक चहर, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bowl first in the final T20I.
Three changes for #TeamIndia in the Playing XI
Live – https://t.co/dpI1gl5uwA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/gq4Ybx4n6V
— BCCI (@BCCI) October 4, 2022
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, लुंगी एनगिडी.
3RD T20I. South Africa XI: Q de Kock (wk), T Bavuma(c), R Rossouw, A Markram, D Miller, T Stubbs, D Pretorius, W Parnell, K Rabada, K Maharaj, L Ngidi. https://t.co/m8hIQQJrdr #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 4, 2022
दरम्यान, तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून ही मालिका नावावर केलेल्या यजमान भारतीय संघाला आज येथे होत असलेला तिसराही सामना जिंकत निर्विवाद वर्चस्वासह दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश देण्याची संधी आहे. तर या मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळायची असल्याने हा सामना जिंकून थोडीफार प्रतिष्ठा राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला विजयाची नितांत गरज आहे.