इंदुर :- तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून ही मालिका नावावर केलेल्या यजमान भारतीय संघाला आज येथे होत असलेला तिसराही सामना जिंकत निर्विवाद वर्चस्वासह दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश देण्याची संधी आहे. तर या मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळायची असल्याने हा सामना जिंकून थोडीफार प्रतिष्ठा राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला विजयाची नितांत गरज आहे.
तत्पूर्वी, झालेल्या नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या (#TeamIndia) बाजूनं लागला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेच्या संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
India have opted to field in the final #INDvSA T20I!
Can they complete a clean sweep? 🤔 pic.twitter.com/tlNlY6iVup
— ICC (@ICC) October 4, 2022
दरम्यान, दुसरीकडे भारतीय संघाला या मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची असल्यामुळे गोलंदाजीत प्रयोग करण्याची ही अखेरची संधी आहे. ही मालिका सलग दोन सामने जिंकल्यामुळे त्यांनी खिशात टाकली असली तरीही अखेरच्या सामन्यासह 2018 सालानंतर दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश देण्याचीही संधी आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा धावांची पस्तीशी किंवा चाळीशी गाठत आहे मात्र, त्याच्या बॅटमधून मोठी खेळी घडलेली नाही. रोहितसाठी इदुरचे मैदान यापूर्वीही अनेकदा लकी ठरले आहे. नेटमध्ये तो पूल शॉटचा कसून सराव करत आहे, कारण तो हा फटका खेळताना सातत्याने बाद होत आहे. त्यामुळे नेटमध्ये त्याने याचा सराव केला असून आता त्याच्या बॅटमधून मोठी खेळी व्हावी अशीच अपेक्षा केली जात आहे.