वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांची मागणी
नगर – तालुक्यातील वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांच्या अधिग्रहित जमिनीवरील एमआयडीसीच्या नोंदी त्वरित रद्द करावी. व सात-बारा उताऱ्यावरील महाराष्ट्र शासनातर्फे उद्योग उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई 32 शिक्का काढण्यात यावा. अशा मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन करण्यात येइल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी भूसंपादन करण्याचे काम चालू आहे. या जामिनी देण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्णपणे विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांची जमिनी ह्या सर्व बागायत असून माजी सैनिकांच्या जमिनीचा ही यात समावेश आहेत. या जमिनी भूसंपादन केल्यास येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे उदरनिर्वाहाचे साधन राहणार नाही. यापूर्वीही वडगाव गुप्ता च्या जमिनी एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी एमआयडीसी येथे सभा बोलावली होती. मात्र, शेतकऱ्यांनी भूसंपादनास तीव्र विरोध दर्शवला होता. हा ठराव पाठवून दहा महिन्याचा कालावधी गेला. तरी अद्याप पर्यंत एमआयडीसीने व शासनाने कोणताही निर्णय ग्रामपंचायत व संबंधित शेतकऱ्याला कळवलेला नाही. तरी आता प्रशासनाने जमिनी संपादन करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. अशी माहिती मिळाली असून, जमिनी अधिग्रहण ची कार्यवाही थांबावी. जमिनी वरील लावलेल्या नोंदी रद्द करावी.
सात बारा वरील महाराष्ट्र शासनाच्या नोंदीचा शिक्का काढावा असेही म्हटले आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर 6 ऑगस्ट पासून उपोषनाचा इशारा शेती बचाव कृति समितीचे अध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी माहिती दिली. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. यावेळी विजय शेवाळे, जालिंदर डोंगरे, प्रभाकर शेवाळे, किसनराव कदम, विजय डोंगरे, सुभाष ढेपे उपस्थित होते.