नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे सुराज्य केले व रामराज्य स्थापन करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल आहे. ध्येय प्राप्तीसाठी लागणारी चिकाटी महाराजांच्या ठाई उपजतच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे, त्याचे अनुकरण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना विधानसभा समन्वयक दत्ता जाधव यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टिळक रोड, नंदनवन मित्र मंडळ व शिवसेना शाखेच्यावतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार निलेश लंके, दत्ता जाधव, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड,
अभिषेक कळमकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, नितीन भुतारे, आदेश जाधव, विशाल जाधव, रवी जाधव, सुरज जाधव, विशाल लोळगे, राज जाधव, अभिषेक दळवी, विकास सपाटे, ओंकार जाधव, निलेश जाधव, मुकेश बैंन, निर्मल साठे, अक्षय गोंधळे, स्वप्नील घटी, अभि गोंधळे, शुभम औरंगे, कुणाल गवळी, शेखर तांबे, विकी हिरणवाळे, कुणाल पडळकर, ओंकार शेळके, प्रतिक भुजबळ, सूर्या जाधव, अरुण सपाटे, राम दामले, तुषार बारस्कर, प्रतिक मंगुडकर, मिलनसिंग जुनी, आदिंसह नंदनवन मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, काळाची पावले ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. आपल्या सहकार्यांना, मावळ्यांना प्रेरणा देत सांघिक भावना निर्माण केली. स्वत: आघाडीवर राहून ते प्रेरणा देत. अशा थोर महापुरुषांचे विचार, आचार हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील, असे सांगितले.