मुंबई – राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार केंव्हा होणार याबाबत रोज नवीन तारखा मिळत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळाचा विस्तार नक्की होणार, असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. अमृत महोत्सवी झेंडावंदन असल्याने त्याआधी विस्तार करावाच लागेल असे त्यांनी सांगितले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार हे कोणाला माहिती नाही. मात्र एक नक्की आहे की, 15 ऑगस्टच्या आधी हा शपथविधी केलाच पाहीजे. तो करावाच लागेल. कारण अमृतमहोत्सवी वर्षाचे हे झेंडावंदन आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या अगोदर हा शपथविधी निश्चितपणे होईल याबाबत शंका नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.