पटना : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) बाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी एक मोठे विधान केले आहे. बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
NRC won't be implemented in Bihar: Nitish Kumar
Read @ANI Story | https://t.co/TiVmc5jpy6 pic.twitter.com/OfZUxYNkok
— ANI Digital (@ani_digital) December 20, 2019
तत्पूर्वी, देशभरात नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबाबत सुरू असलेल्या निषेधाबद्दल नितीश कुमार यांनी आपले मौन सोडले आहे. ते म्हणाले की बिहारमधील जनता दल युनायटेडच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये अल्पसंख्याक पूर्णपणे सुरक्षित आहेत.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले होते की आम्ही ज्यूर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत अल्पसंख्याक समुदायाबरोबर काहीही चुकीचेहोणार नाही. नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले विरोधक अल्पसंख्याकांमध्ये संभ्रम पसरवित आहेत. विरोधी पक्ष अल्पसंख्यांकांना भडकवत असून त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत.