हैदराबाद: “आम्ही कर्नाटकमधील सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार नाही पण या वर्षाच्या अखेरीपर्यंत हे सरकार स्वताहूनच पडेल. असा आमचा विश्वास असल्याचे भाजपचे कर्नाटकाचे निरीक्षक पी. मुरलीधर राव यांनी म्हटले आहे.
पी. मुरलीधर राव म्हणाले, कॉंग्रेस आणि जेडीएस सरकार सत्तेवर येऊन आता एक वर्ष होत आहे. पण हे सरकार स्थीर आहे असे कधीच वाटले नाही. त्यांच्यातील लाथाळ्यामुळेच हे सरकार पडेल त्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागणार नाहीत.
सध्या सत्ताधारी आघाडीकडे 117 आमदार असून भाजपकडे 104 आमदार आहेत. केवळ सत्तेसाठी त्यांच्यात आघाडी झाली आहे लोकांना मात्र हे आघाडीचे सरकार नको आहे असा कौल त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिला आहे असेही त्यांनी नमूद केले.