Buldhana Bus Accident : बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसने पेट घेतल्याने आणि डिझेलची टाकी फुटून आग पसरल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या महामार्गाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यासोबतच या अपघातावर शोक देखील व्यक्त केले आहे. याविषयी एक ट्विट करत त्यांनी, बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्रक ड्रायव्हर्स तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत. अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केली.