मुंबई – ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. खारघर येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनुयायी आले होते. यावेळी अनेकांना तीव्र उन्हाचा त्रास झाला. यामुळे ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून सरकार विरोधी प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीसह राज्यातील सर्वच विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. पन्नास खोके देऊन आमदार विकत घेऊ शकता परंतु मृत्युमुखी पडलेल्यांना तुटपुंजी रक्कम दिली जाते हा कोणता न्याय ? असा सवाल आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त करत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी ट्विट देखील केले आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांना या कार्यक्रमासोबत शक्तिप्रदर्शन करायचे होते म्हणून कडक उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले आला आरोप देखील मेनन यांनी केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात,”मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायला हवा तसेच आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. परंतु राज्यातील आपल्या लोकांचा जणू सपोर्ट हरवला आहे म्हणून आम्ही फक्त #NoOneKilledUsInKharghar म्हणू आणि पुढे जाऊ”
The CM has no moral right to tell us what to do – he should take responsibility and resign.
The organisers should be booked for culpable homicide.
But this is wishful thinking. In our state people have lost their spine so we will just say #NoOneKilledUsInKharghar and move on.— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) April 17, 2023
काय घडलं नेमकं खारघरमध्ये
नवी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. पण, आज ४२ अंश सेल्सियस तापमान असल्याने पुरस्कार सोहळ्यात आलेल्या अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 123 हून अधिक लोकांना तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला लाखो अनुयायी उपस्थित होते. या कार्यक्रमास सकाळी 11.30च्या सुमारास सुरू झाली. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता.
याप्रसंगी उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था उघड्यावर करण्यात आली होती. यामुळे तीव्र उष्णतेमुळे कार्यक्रमादरम्यान एकूण 123 जणांना डिहायड्रेशनसारख्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. यापैकी 13 रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे.