बारामती, (प्रतिनिधी)- बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध गेलेत बारामती पोलिसांना यश आले आहे. त्याच्याही मुलींना त्यांच्या घरी पोचविण्यात आले.
रोजी शहरातील एका स्कूलमध्ये शिकणाऱ्या १३ ते १५ वयोगटातील चार मुली रात्री नऊ वाजले तरी घरी आल्या नाहीत. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबतची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात दिली. चारही मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवल्याची शक्यता पालकांनी वर्तवली. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून लागलीच तपास सुरू केला.
पोलिसांनी तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदर मुलींची माहीती घेवून मुली पुणे स्टेशन परिसरात आहेत, अशी तांत्रीक दृष्ट्या माहीती मिळवली. मुली पुढे असल्याचे कळताच पुणे शहर बंडगार्डन पोलीसांशी संपर्क केला. बंडगार्डन पोलिसांनी एक तासात म्हणजे मुलींना ताब्यात घेतले. बारामती पोलिसांनी त्या चारही मुलींना बारामती येथे सुखरूप आणले. त्या मुलींना पालकांचे ताब्यात दिले.
त्याबाबत पालकांनी पोलिसांचे आभार मानलेले आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पाडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व अमंलदार श्रीकांत गोसावी, बापू इंगोले यांनी कामगीरी केलेली आहे.