bollywood : बॉलीवूड सेलेब्समध्ये वाद आणि मारामारी नेहमीचीच आहे. बॉलीवूड सेलेब्सचे वाद कधी पटकन सोडवली जातात तर काही वाद वर्षानुवर्षे सुरू राहतात. असे काही वाद असतात ज्यामुळे सेलिब्रिटी एकमेकांचे शत्रू बनतात. त्यांना एकमेकांचे तोंडही बघायचे नाही. अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यातही असाच एक वाद आहे.
रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांची नावे 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जातात. या दोघीनी ‘अंदाज अपना अपना’, ‘रक्षक’ आणि ‘आतिश’मध्ये एकत्र काम केले. यादरम्यान दोघांमध्ये अशी भांडणे झाली की त्यांनी एकमेकांचे केसही ओढत मारहाण केली होती.
कोरिओग्राफरने कॅटफाईटचा खुलासा
2007 मध्ये कॉफी विथ करणच्या एका एपिसोडदरम्यान, कोरिओग्राफर फराह खानने करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यातील या कॅटफाइटबद्दल खुलासा केला होता. फराहने सांगितले, ‘आतिश फील द फायर’ चित्रपटाच्या गाण्याच्या सीक्वेन्सदरम्यान रवीना आणि करिश्मा एकमेकांना मारहाण केली. दोघींनी केस पकडत एकमेकांना मारहाणही केली.
रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांनी 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘आतिश’ चित्रपटात एकत्र काम केले होते. फराह खान चित्रपटातील एका गाण्याचे कोरिओग्राफी करत होती. या गाण्यात रवीना आणि करिश्मा होत्या. शूटिंगदरम्यानच दोघींमध्ये भांडण झाले आणि त्या केसांच्या विगने एकमेकांना मारू लागल्या. यानंतर त्या एकमेकांचे केस ओढू लागल्या.
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, या भांडणाचे कारण दुसरे कोणी नसून अभिनेता अजय देवगण होता. खरं तर, एकेकाळी करिश्मा आणि रवीना दोघीही अजयच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळी अजय देवगण रवीना टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नंतर अशा बातम्या येऊ लागल्या की अजयने रवीनासोबत ब्रेकअप केले आहे आणि आता तो करिश्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अशात रवीना आणि करीना समोरासमोर आल्यावर एकमेकांना मारू लागल्या.