इंदापूर : खासदार संजय राऊत यांनी सरकारने चुकीच्या केलेल्या कारभारावर लिखाण केले. त्यांना तुरुंगात टाकले, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख त्यांनी ऐकले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. झारखंडचे मुख्यमंत्री यांना तुरुंगात पाठवले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीची कारवाई करत तुरुंगात पाठवले. जनतेच्या मुलांसाठी त्यांनी आदर्श शाळा काढल्या. त्या शाळा हिंदुस्थानात आदर्श कार्य करत आहेत. 78 आमदार केजरीवाल यांनी निवडून आणले. 98 टक्के जनतेने संधी दिलेले लोकप्रिय मुख्यमंत्री यांना त्रास दिला जातोय. भाजप सत्तेचा वापर विरोधकांना तुरंगात टाकण्यासाठी करते आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आयोजित शेतकरी मेळावा (दि. 23) शहरातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या प्रांगणावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्रीआमदार बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, रोहित पवार,
शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार, राजेंद्र पवार, जगन्नाथ शेवाळे, युवक नेते युगेंद्र पवार, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, कालिदास देवकर, राहुल मखरे, अमोल देवकाते, अमोल भिसे,अमोल मुळे, सागर मिसाळ, छाया पडसळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे तालुक्यातील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट झालेल्या आजपर्यंत दिसले नाही. मी देशाचा कृषिमंत्री होतो तेव्हा भाजप विरोधी बाकावर होते. आक्रमक झाले होते तरी देखील कांद्याचे भाव खाली येऊ दिले नाहीत. कांद्याचे भाव कमी करा म्हणून भाजपच्या लोकांनी कांद्याच्या माळा घातल्या होत्या.मात्र मी सांगितले कांद्याच्या माळा घाला नाहीतर, कवड्याच्या माळा घाला.मी भूमिका बदलणार नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या घामाची किंमत मिळालीच पाहिजे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. मेळाव्याचे प्रस्ताविक कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी तर तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी आभार मानले.
मला इंदापूरकरांनी प्रेम दिल तेवढच शर्मिला वहिनी, राजू दादा, श्रीनिवास बाप्पू यांना दिले आहे. लोकशाही मार्गाने प्रचार करत आहेत.आहे तरी देखील विरोधक विनाकारण त्रास देत आहोत. इंदापूरमध्ये यंदा जोरदार तुतारी वाजणार याची मला गॅरंटी आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार
शंकररावांच्या डोक्यात सत्ता गेली नाही
मी निवडून येण्याअगोदर शंकरराव पाटील इथून निवडून येत आहेत. त्यांनी राजकारण केले. मात्र त्यांनी सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. हवेत कधी राहिले नाहीत. स्वच्छ कारभार कधी सोडला नाही त्यामुळे साहजिकच त्यांचे स्मरण आज आम्हाला होते, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.